गुरुवार, ७ सप्टेंबर, २००६

घरटं

पाखरं येतात, जागा शोधतात
काट्या-कुट्या जमा करतात
वळचणीला इवलंस घरटं उभं राहतं...

नवी पिढी जन्म घेते,
हसते, खेळते, बागडते
घरट्याचं मन कृतार्थ होतं.

पंखात बळ येतं तेव्हा
पाखरं उडून जातात,
उध्वस्त होऊन वळचणीला
'घरटं' मात्र शिल्लक राहतं.

मुक्या मनात उमणारे
पण कुणालाच न कळणारे
निःशब्द भाव एकटंच बोलंत राहतं...

पाखरांच्या आठवणी आल्या
की अदृष्य टीपे गाळत राहतं
काट्याकुट्यांच्या संसारात नसलेलं अस्तित्त्व
तेही शेवटी हरवून दातं...

जान्हवी मुळे.

...................................................................................................................................
© All Rights to this and all poems published in this Blog are reserved. Reproduction of any kind without prior permission of the Wirter is not allowed.

0 टिप्पणी(ण्या):